शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

पक्षाने आदेश दिल्यास ‘उत्तर’मधून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 00:25 IST

कोल्हापूर : ‘उत्तर’मधून महेश जाधव, सत्यजित कदम यांच्यापैकी कोणी लढायचे हे ठरलेले नाही, सुहास लटोरे यांचेही नाव येऊ शकते. त्यामुळे सगळ्यांनीच ताकदीने काम करायचे. माझ्यासह मधुरिमाराजे व आमदार सतेज पाटील यांचे पुतणे ऋतुराज पाटील यांच्याही नावांची चर्चा आहे; पण आपण निवडणूक लढविण्यास इच्छुक नाही. आपण कोरे पाकीट आहे. त्याने कुठे ...

कोल्हापूर : ‘उत्तर’मधून महेश जाधव, सत्यजित कदम यांच्यापैकी कोणी लढायचे हे ठरलेले नाही, सुहास लटोरे यांचेही नाव येऊ शकते. त्यामुळे सगळ्यांनीच ताकदीने काम करायचे. माझ्यासह मधुरिमाराजे व आमदार सतेज पाटील यांचे पुतणे ऋतुराज पाटील यांच्याही नावांची चर्चा आहे; पण आपण निवडणूक लढविण्यास इच्छुक नाही. आपण कोरे पाकीट आहे. त्याने कुठे जायचे हे त्यावर लिहिणाऱ्यांच्या हातात असते. पक्षश्रेष्ठींनी आदेश दिला तर कदाचित मलाही लढावे लागेल, असे संकेत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.भाजपच्या ‘उत्तर’ विधानसभा मतदारसंघातील बूथ प्रमुखांचा मेळावा रविवारी आयर्विन ख्रिश्चन हॉलमध्ये झाला. त्यावेळी ते बोलत होते. मंत्री पाटील म्हणाले, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिकेसह ‘हुपरी’ व ‘आजरा’ नगरपंचायतीही भाजपने जिंकल्याने आमचा आत्मविश्वास वाढला आहे. विचारपूर्वक सांगतो, ‘भाजप ठरवेल ते खासदार आणि म्हणेल तोच आमदार होईल,’ असेही त्यांनी सांगितले.पश्चिम महाराष्टÑ देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव म्हणाले, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शहरात केलेल्या कामांची माहिती घरोघरी पोहोचवून पक्ष बळकटीसाठी कामाला लागा. महानगर अध्यक्ष संदीप देसाई यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. आमदार सुरेश हाळवणकर यांनी सरकारच्या योजनांची माहिती दिली. ‘गोकुळ’चे संचालक बाबा देसाई, स्थायी समिती सभापती आशिष ढवळे, विजय सूर्यवंशी, राहुल चिकोडे, सुभाष रामुगडे, आदी उपस्थित होते.उत्तर प्रदेश, कर्नाटक यशाचे गमकएका बुथामध्ये मृत, स्थलांतरित वजा जाता साधारणत: दोनशे घरांमधील आठशे मतदान होते. दहा कार्यकर्त्यांना प्रत्येकी २० घरे येणार आहेत. त्यांनी महिन्याला प्रत्येकाच्या घरी जाऊन भेटायचे, अडचणी समजावून घ्यायच्या, त्यांना मदत करायची. लोकसभेपर्यंत १२ वेळा, तर विधानसभेपर्यंत १८ वेळा तुम्ही त्या घरात जाणार असल्याने आपोआपच आपुलकी निर्माण होऊन त्याचे रूपांतर मतदानात होईल. हेच काम उत्तर प्रदेश व कर्नाटकात केल्याने यश मिळाल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले.पाच-सहा महिन्यांत बºयाच घडामोडी‘उत्तर’ची तयारी नेटाने सुरू केली असून रोज एका नगरसेवकाला बोलावून घेऊन स्वतंत्र चर्चा करतो. पाच-सहा महिन्यांत कोण कुठे जाऊन बसणार आहे, हे मला चांगले माहिती आहे. त्यामुळे निवडणूक अधिक सोपी होईल, असेही मंत्री पाटील यांनी सांगितले.पास झालेल्यांचे अभिनंदनबूथ कार्यकर्त्यांनी घराघरांपर्यंत जाऊन संपर्क मोहीम राबविण्याचा मंत्र देऊन पाटील म्हणाले, दहावी-बारावीचे निकाल लागले की पास झालेल्या विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन अभिनंदन करा, नापास झालेल्यांच्या घरी जाऊन त्यांचे सांत्वन करा.